०२ ऑक्टोबर २०१९

ग्रामसेवक मित्र


नमस्कार मित्रांनो,


           ग्रामविकासाचा महत्वाचा पाया म्हणजे ग्रामसेवक. खेड्याकडे चला किंवा खेडी स्वयंपूर्ण झाली तरच राज्याच्या आणि पर्यायाने देशाचा विकास होईल , असे अनेक महापुरुष सांगून गेले. पण खेड्यांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा ग्रामसेवक कायम दुर्लक्षितच राहिला. कामकाज करताना कुठे अनियमितता झाली तर कारवाईची तलवार प्रथम ग्रामसेवकाच्या गळ्यावर फिरविली जाते. नवीन योजना,  अभियान राबवायची झाल्यास त्वरित अहवाल किंवा प्रस्ताव मागविण्यात येतो,  त्यामुळे शासन निर्णयाचा परिपूर्ण अभ्यास केला जात नाही व  ग्रामसेवकांच्या अडचणीमध्ये अजून भर पडते.
           मित्रांनो, या सर्व अडचणींवर मात करणेसाठी एक छोटासा पर्यंत म्हणुन मी  ' ग्रामसेवक मित्र ' या नावाने ब्लॉग सूरू केला आहे. या ब्लॉग मध्ये आपल्याला विविध विषयावरील सर्व शासन निर्णय, परिपत्रक व याबाबत शॉर्ट नोट्स देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आशा आहे की या माहितीचा आपल्या कामकाजामध्ये निश्चितपणे फायदा होईल. ब्लॉग वरील commets च्या माध्यमातून त्या विषयावर चर्चा होईल व सर्वांचे शंका निरसन होईल.
           तर मित्रांनो आपल्या माहितीत भर घालण्यासाठी व नेहमी अपडेट राहण्यासाठी search करा https://gramsevakmitra.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: